खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

नगर मनमाड राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा रविंद्र मोरे

अहमदनगर : जिल्हातील राहुरी येथे बैलगाडा शर्यतवरील शासनाने घातलेली बंदी त्वरीत उठवावी. अन्यथा नगर मनमाड राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा रविंद्र मोरे यांनी दिला. 
तसेच राहुरी तालूका बैलगाडा संघटनेच्या वतीने महसूल व पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आले. 
दिनांक ५ ऑगस्ट रोजी राहुरी तालुक्यातील बैलगाडा संघटनेच्या वतीने पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ तसेच नायब तहसीलदार डमाळे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
शासनाने गेल्या अनेक वर्षांपासून बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली आहे. ती बंदी उठवण्यात यावी. या मागणीसाठी राहुरी शहर हद्दीतील नगर मनमाड राज्य महामार्गावर बाजार समिती समोर दिनांक ११ ऑगस्ट रोजी सकाळी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. 

जोपर्यंत बैलगाडा संघटनेच्या मागण्या मान्य होत नाहीत. तोपर्यंत आंदोलन होत राहील. असे निवेदनात म्हटले आहे. 
 
दिलेल्या फिर्यादीवर रविंद्र मोरे, महेश हापसे, अच्युत दुशिंग, अनिल गायकवाड, बाळासाहेब खुळे, कैलास आढाव.

सोमनाथ कर्पे, रविंद्र हापसे, धनंजय काळे, विनोद तमनर, भगवान डोंगरे, अभिजित कोकाटे. 
अलिम पठाण, अविनाश गागरे, दादा बाचकर, पंकज यादव, भैय्या ढोकणे, दिशांत हरिश्चंद्रे, राहुल तमनर आदींच्या सह्या आहे.

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools