लॉकडाऊन मुळे हाताला काम नाही पोटाला अन्न नाही, अशा परिस्थितीत करायचे काय?
या चिंतेमुळे मसणजोगी समाजाचे नागरिक हतबल झाले आहेत.
कोरोना व्हायरस चा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉकडाउन केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद केल्याने रोजगारासाठी घराबाहेर पडता येत नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
त्यामुळे आता पोटाची खळगी भरायची कशी असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. घरात धान्याचा कणही शिल्लक नसल्याने त्यांना उपाशी राहून दिवस काढण्याची वेळ आली आहे घराच्या बाहेर पडावे तर कोरोना ची भीती आणि घरात उपासमार अशा दुहेरी कात्रीत हे मसनजोगी मजूर सापडले असून, प्रशासनाने मदत करावे अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.
त्यामुळे प्रशासनाने पुढाकार घेऊन याकडे लक्ष देण्याचे खूप गरजेचे ठरले आहे..
0 Comments