रविवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास अपघाताची घडली घडली आहे.
रेल्वे रुळाचे चाव्या काढण्यात आल्याने हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज रेल्वे अधिकऱ्यांनी वर्तविला असे अधिकारी यांनी सांगितले.
बडनेरा, अमरावती येथील रेल्वे अधिकारी कर्मचाऱ्याचा ताफा घटनस्थळी दाखल झाला असून नरखेड मार्गावर मालगाडी चे डबे घसरण झाल्याने रविवारी नरखेड काचीगुडा एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.
तर जयपूर सिकांदरा बाद एक्स्प्रेस दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आले आहे .
बल्लारशा येथून अमरावती जिल्ह्यातील डवरगाव येथील सोफिया औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पत कोळसा मालगाडीने नेला जात होता.
मालगाडीचे एकूण 29 डबे होते मात्र वलगाव ओलांडताच शिराळा येथे अचानक मालगाडीचे 22 डाबे रुळा वरून खाली घसरले, नरखेड रेल्वे मार्ग पुर्ववत करण्यासाठी 8 ते 10 तास लागणार आहे,
अशी माहिती आमचे प्रतिनिधी अमर वानखडे यांनी अधिकारी यांचेकडून जाणून घेतली.!
0 Comments