राहुरी फॅक्टरी - स्व डाॅ बाबुरावदादा तनपुरेंनी बहुकष्टातुन अमेरिका सारख्या देशातून प्रायोगिक तत्त्वावर आशिया खंडात सर्वात पहिली मुळा-प्रवरा सहकारी वीज संस्था आणली.
दुरदृष्टी डोळ्यासमोर ठेवून मुळा धरण, डावा कालवा आराखड्यात नसतांनाही मोठ्या कौशल्याने बसविला. तसेच राहुरीत कृषी विद्यापीठ स्थापणेने कृषी क्षेत्रात उल्लेखनीय क्रांती घडली.
राहुरीत लघु औद्योगिक विकास महामंडळ स्थापन केले.या अलौकिक कार्याने रोजगाराच्या अनेक संधी निर्माण झाल्या. म्हणुन स्व.दादांचेअतुलनीय कार्याचे पुर्नमुल्यांकन व्हावे. आणि महाविकास आघाडी सरकारने स्व.डाॅ.बाबुराव तनपूरेना किमान पद्मविभूषण देण्यासाठी भारत सरकारकडे शिफारस करावी असे सामाजिक भावनेतून श्रीरामपुर जिल्हा विकास प्रतिष्ठाण संस्थापक अध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी प्रतिपादन केले.
राहुरी कारखाना येथे स्व दादांचे जयंती निमित्ताने आयोजीत कार्यक्रमात राजेंद्र लांडगे बोलत होते.
स्व दादांना किमाण मरणोत्तर पद्मविभूषण देण्यासाठी सामाजिक भावनेतून सरकार दरबारी उच्चस्तरीय पाठपुरावाही करु अशी ग्वाही लांडगेंनी उपस्थितांना दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरुन चैतन्य उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष गणेश भांडं म्हणाले कि स्व.बाबुरावदादा तनपुरे यांचेमुळेच कृषी क्षेत्रात मोठी प्रगती झाली.
शिवाय सर्वात महत्वाचे अनेक गरजुंना रोजगार निर्माण करुन दिला.नवीन पिढी उच्चशिक्षीत झाली. असेही भांड म्हटलं प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त अभियंता दत्ता पाटील कडु यांनी स्व.दादांचे आठवणीला उजाळा दिला.
दादांचे राजकीय, शैक्षणिक, सामाजिक आणि क्रिडा क्षेत्रातील काहि ज्वलंत अनुभव सांगीतले. स्व दादा महाराष्ट्र राज्याचे राजकारण राहुरीतुन करत होते.राज्याला सक्षम मुख्यमंत्री कोण द्यायचा, कोणती खाते कोणत्या मंत्र्याकडे द्यायचे हे स्व. दादा ठरवत होते. त्यांचा राजकारणात राज्यभर आदरयुक्त दरारा होता.
यावेळी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरै यांनी कामाचे व्यस्ततेतुन वेळ काढत दादांचे प्रतिमेस विनम्रपणे अभिवादन केले.
याप्रसंगी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विष्णू गिते सुनील विश्वासराव डाॅ विलास पाटील, रामभाऊ काळे, बाळासाहेब घुले, शिवाजीराव कपाळे, किशोरराव सुनील, विश्वासराव थोरात, विलास मुसमाडे आदींनी स्व दादांचे विविध धाडसी नेतृत्वाचे दर्शन घडविणारे प्रसंग सांगत मनोगत व्यक्त केले.
यावेळी देवळाली नगरपरिषदेचे नगरसेवक आदिनाथ कराळे, ज्ञानेश्वर वाणी, तुषार शेटे, भास्करराव कोळसे, रामभाऊ जगताप, हभप संपत जाधव, रफिक सय्यद, निलेश कुंभार, रामफळे,
ओंकार गिरी, भोमा शिंदे, नेल्सन कदम, आशिष संसारे, प्रताप धावडे, जाविद सय्यद, पारस चोरडीया, सचिन साळवे, बापुसाहेब शिंदे, नंदुभाऊ सांगळे इत्यादी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उत्कृष्ट सुत्र संचालन सर्जेराव शेटे यांनी करुन उपस्थितांचे श्रीकांत मेळवणेंनी आभार मानले.
0 Comments