छत्रपती संभाजीनगर : नव्या भारताचे स्वप्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रारंभीच पाहिले.
चले जाव आंदोलनात स्वतंत्र भारत जातीमुक्त , धर्मनिरपेक्ष समताधिष्ठीत असायला पाहिजे.
विज्ञान तंत्रज्ञान व उद्योग, धंदे , आधुनिक शेती यातूनच देशाची जडणघडण होईल , यावर त्यांचा विश्वास होता.
शिक्षणातून बौद्धिक कल्पकता, प्रामाणिकपणा , गुणवत्ता यातूनच राष्ट्राची उभारणी शक्य आहे.
आज नाॅलेज ईकाॅनाॅमी अर्थात सर्वच परिवर्तनासाठी ज्ञानच मुख्य हत्यार , साधन आहे. " असे प्रतिपादन डॉ. सुधीर गव्हाणे यचममुवि व एमजीएम विद्यापीठाचे माजी कुलगुरू यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबई च्या 79 व्या वर्धापनदिनानिमित्त केले.
सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रकुलगुरू डाॅ. वाल्मीक सरवदे हे होते.
0 Comments